मुंबई – सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एन.डी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवले आहे. नितीन देसाई कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात सर्वोच्चस्थानी होते.
कलादिग्दर्शक असण्याबरोबरच निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते म्हणूनही त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ यांसारख्या सुपरहिट सिनेमाचे कला दिग्दर्शन त्यांनी केले. चारवेळा सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. जागतिक दर्जाच्या एन.डी स्टुडीओ निर्मितीतून सौंदर्यदृष्टीचं, कलागुणांचं, ध्येयवेडाचं दर्शन घडवलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितिन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितिन देसाई हे इंडस्ट्रीतले मोठं नाव आहे. नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. राज ठाकरे आणि नितीन देसाई यांची देखील अत्यंत चांगले संबंध होते.
राज ठाकरे आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले की, “ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास 30 वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो,
ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस… pic.twitter.com/tJjqeXeH4q
— Raj Thackeray (@RajThackeray) August 2, 2023
त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे. नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल ? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे. असो, कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा,’ असं त्यांनी लिहिलं आहे.