बॉलीवूडमधील काही स्टार्स कलाकारांसाठी यंदाची दिवाळी ही खूपच खास राहिली आहे. कारण ही त्यांची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. लग्नानंतर येणारा प्रत्येक सण हा या कपल्ससाठी एकमेकांना आणखी जवळ आणण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतो. अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांची ही पहिली दिवाळी आहे.
जी दोघांसाठीही खूपच आकर्षक ठरणार आहे. वरुण याच वर्षी जानेवारीत आपली बालमैत्रीण असलेल्या नताशाशी विवाहबंधनात अडकला आहे. काही दिवसांपूर्वीच नताशा आणि वरुणने आपला पहिला करवाचौथदेखील सेलिब्रेट केला होता.
या सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीच्या यादीत यामी गौतमचेही नाव आहे. जिने याच वर्षी जूनमध्ये आदित्य धरसोबत सात फेरे घेतले होते.
या दोघांनी करोना काळात लग्न केल्याने याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती. यामी सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते आणि ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रसिद्धीच्या झोतात असते.