नवी दिल्ली: लोकशाहीवर विश्वास ठेवण्याबरोबरच भांडवलशाहीचा आदर असणारा भारत देश सोडून संपूर्ण जगात गुंतवणूकदारांना चांगले स्थान मिळणार नाही. असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या मुख्यालयात झालेल्या संभाषणाच्या सत्रात सीतारमण यांनी जगभरातील गुंतवणूकदारांना सरकार नवनवीन सुधारणा आणण्यासाठी सतत कार्यरत असल्याचे आश्वासन दिले.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एफआयसीसीआय) आणि यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात निर्मला सीतारामन बोलत होत्या.
आज भारताची सर्वात वेगवान विकसनशील अर्थव्यवस्था आहे. त्यात उत्कृष्ट कुशल मनुष्यबळ आणि सरकार आहे. जे सुधारणेसाठी लोकशाही आणि कायद्याच्या आवश्यक गोष्टींवर सतत काम करत असल्याचे सीतारामन म्हणाल्या.
गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक का करावी या प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, न्यायालयीन व्यवस्थेत थोडा उशीर झाला असला तरी भारत एक पारदर्शक व मुक्त समाज आहे. भारतात कायदा व सुव्यवस्था ठेवून काम केले जात आहे. आणि विलंब कमी करण्याच्या दिशेनेही सुधारणा वेगाने होत आहेत.