नवी दिल्ली – पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरातील दहशतवादी तळांवर अजूनही मोठ्या संख्येने दहशतवादी उपस्थित आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री मंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
सीमेपलिकडून देशात होणाऱ्या घुसखोरीमध्ये घट झाली आहे. 2018 मध्ये घुसखोरीच्या 143 घटना घडल्या होत्या, तर 2019 मध्ये 138, 2020 मध्ये 51 घटना घडल्या होत्या. मात्र 2021 मध्ये घुसखोरीच्या 34 घटना घडल्या आहेत, असे राय यांनी सांगितले.
प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारत आणि पाकिस्तानच्यावतीने गेल्या वर्षभरापासून युद्धबंदी पाळली जात आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ पाकिस्तानने काही बांधकाम केले आहे का, आणि सीमेपलिकडच्या दहशतवादी तळांवरून घुसखोरीचा प्रयत्न झाला का, असे विचारले असता नित्यानंद राय यांनी ही माहिती राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची आणि संवेदनशील आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या हुताच्या दृष्टीने ती सांगितली जाऊ शकत नाही, असे उत्तर दिले.
केंद्र सरकारकडून सातत्याने ताबा रेषेवरील सुरक्षेचा आढावा घेतला जात असतो. कोणतेही संभाव्य धोके टाळण्यासाठी उपाय योजनाही केल्या जात असतात, असेही नित्यानंद राय यांनी लोकसभेत सांगितले.