मुंबई – शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी शिवाजी पार्क मैदानावर कोण दसरा मेळावा घेणार याचा फैसला काल उच्च न्ययालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला. यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. आता २७ तारखेकडे होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात सध्याच्या सरकारबाबत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी महत्वाची टिपण्णी केली आहे.
शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी महत्वाचे विधान केले आहे. १६ आमदार अपात्र ठरले यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील नाव आहे जर ते अपात्र झाले तर हे सरकार देखील कोसळले असं बापट यावेळी म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उल्हास बापट बोलत होते. उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याबाबत दिलेला निर्णय कायद्याला धरून असल्याचे देखील बापट यांनी यावेळी सांगितले.
काय म्हणाले घटनातज्ञ बापट यावेळी
१६ लोक जे बाहेर पडलेत ते अपात्र व्हायला हवेत असा माझा अभ्यास मला सांगतो,सुप्रीम कोर्टानं 27 तारखेला निकाल देणं अपेक्षित आहे. काल शिवसेनेला मिळालेली परवानगी ही घटनेला धरून आहे. जर शिंदे गटानं कोर्टात जरी याचिका दाखल केली तरी हायकोर्टाचं निरीक्षण नोंदवलं जातं. कधीकधी हायकोर्टाचे निर्णय सुप्रीम कोर्ट फिरवतं मात्र कालचा निर्णय घटनेला धरून आहे, असंही बापट यांनी यावेळी स्पष्ट केलं.