Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis| महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी तपास बंद करण्याचा अर्ज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात ‘सी’ समरी रिपोर्ट देखील सादर केला आहे. अजित पवार हे या बँकेचे अध्यक्ष असताना हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यावरून ठाकरे गटाच्या ‘सामना’ अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. इतकेच काय तर फडणवीसांनी शिखर बँक घोटाळ्याचे पुरावे नष्ट केले असतील, तर त्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे देखील यात म्हंटले आहे.
काय लिहिले सामना अग्रलेखात?
“ज्या राज्य बँक घोटाळय़ात देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार होते, हा त्यांचा आत्मनिर्धार होता, त्या घोटाळ्य़ाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंडाळला. अजित पवारांविरोधात पोलिसांना काहीच ठोस सापडत नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. अशा तऱ्हेने भाजपने पवारांना एकापाठोपाठ एक असा दिलासा देण्याचा सपाटाच लावला आहे. अजित पवारांच्या कथित बँक घोटाळ्यांवर फडणवीस यांनी तांडव केले होते,” असे सामना अग्रलेखात लिहिले आहे.
फडणवीसांनी शिखर बँक घोटाळ्याचे पुरावे नष्ट केले असतील तर… Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis|
“महाराष्ट्रात जनतेचा पैसा पवारांनी व त्यांच्या गँगने लुटल्याचा आरोपच नव्हे, तर आपल्याकडे पुरावे असल्याचे ते सांगत होते. आता या पुराव्यांचे काय झाले? हे पुरावे त्यांनी गिळून ढेकर दिला की आणखी काही केले? भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना साथ देण्याची ‘मोदी गॅरंटी’ फडणवीस यांनी अमलात आणली ती अशी. फडणवीसांनी शिखर बँक घोटाळ्याचे पुरावे नष्ट केले असतील तर त्या आरोपाखाली फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. पुराव्यांशी छेडछाड करणे हा अपराध आहे,” असे म्हणत ठाकरे गटाने फडणवीसांवर टीका केली आहे.
सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पती अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी, कुटुंबास मनस्ताप देऊन काकांच्या पाठीत सुरा खुपसण्यास भाग पाडल्याच्या सबबीखाली देवेंद्र फडणवीस व त्यांच्या लोकांवर अब्रुनुकसानीचा खटलाच चालवायला हवा. कुणीही उठायचे व बदनामीचा चिखल उडवायचा हे बरे नसल्याचा टोला देखील यात लगावण्यात आला आहे.
गेल्या दहा वर्षांत खोटेपणाचे उंच डोंगर उभे केले Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis|
“गेल्या दहा वर्षांत जेवढे घोटाळे झाले ते गेल्या 70-75 वर्षांत झाले नसतील. गेल्या दहा वर्षांत खोटेपणाचे जेवढे उंच डोंगर उभे केले, त्यापुढे हिमालयाची उंचीही तोकडी पडेल. हर्षवर्धन पाटील, हसन मुश्रीफ यांच्याप्रमाणे आता अजित पवारांनाही शांत झोप लागायला सुरुवात होईल. राज्य बँक घोटाळ्यांमुळे अजित पवारांना नाहक मनस्ताप झाला. त्यांना कुटुंब-पक्षाचा त्याग करावा लागला. बदनामी झाली ती वेगळीच, ” असे यात लिहिले आहे.
हेही वाचा :
Pune Traffic : पुण्यात वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘या’ दिवसापासून अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’
JP Nadda | जेपी नड्डा यांचा नागपूर दौरा अचानक रद्द; कारणं आले समोर