माजी उपसरपंच बाळासाहेब गावडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वाघोली(प्रतिनिधी) : ग्रामपंचायत शिरसवडी तालुका हवेली जिल्हा पुणे हद्दीत असणाऱ्या प्रिकास्ट इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला डोंगरगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीवरून होणारा बेकायदा पाणीपुरवठा तातडीने बंद करणे बाबत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बाळासाहेब गावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करून केली आहे.
गावडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की ग्रामपंचायत शिरसवडी तालुका हवेली यांचे तर्फे सरपंच दीप्ती सतीश नागवडे, ग्रामसेवक आर दवणे व प्रीकास्ट इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मध्ये दिनांक 18 डिसेंबर 2015 रोजी पाण्याच्या योजनेबाबत पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर झालेल्या करारनाम्यानुसार ग्रामपंचायत शिरसवडी ला पाणीपुरवठा योजना सुरू करण्याबाबत डोंगरगाव तालुका हवेली येथील गट नंबर 75 या मिळकती पैकी तीन आर क्षेत्र विहिरीसाठी ग्रामपंचायतीने विकत घेऊन या जागेतून मौजे शिरसवडी ग्रामस्थांसाठी पाण्याची योजना राबविण्याबाबत निर्णय घेतला.
या योजनेतील नियम व अटी नुसार डोंगरगाव हद्दीतील याच विहिरीतून गावकऱ्यांना व प्री कास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पाणी देण्याबाबत नियोजन करण्यात आले याबाबतचा ग्रामपंचायत व कंपनी यांच्यातील खर्चाचा हिस्सा देखील ठरवण्यात आला.याशिवाय या पाण्याच्या उप सा कामी लागणाऱ्या विजेचा एकूण खर्च देखील करण्याबाबत नियोजन करण्यात आले .ही योजना डोंगरगाव हद्दीतील विहिरीतून शिरसवडी गावापर्यंत अशा स्वरूपात नियोजित करण्यात आली. डोंगरगाव हद्दीत असणार्या विहिरीतून पाणीपुरवठा योजना राबवली जाण्याचा ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायतीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला होता. मात्र सध्या डोंगरगाव हद्दीतील असणाऱ्या भीमा नदीतून शिरसवडी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या वतीने योग्य त्या परवानग्या घेऊन योजना पुढे कार्य ठेवण्यात आली.. मात्र याच परवानगीचा गैरफायदा घेऊन नदीच्या पाण्याचा वापर औद्योगिक क्षेत्र म्हणजेच प्रीकास्ट इंडिया लिमिटेड साठी सध्या बेकायदेशीरपणे चालू असून लाखो लिटर पाणी विनापरवाना ग्रामपंचायतीच्या संमतीशिवाय शासनाच्या परवानगी शिवाय बेकायदेशीरपणे कंपनीकडून उपसा केला जात आहे.
याबाबत ग्रामपंचायतीने नदीच्या पाण्याचा वापर औद्योगीकरणासाठी नको असा मनाई चा ठराव देखील काही दिवसांपूर्वी केला होता. परंतु या ग्रामपंचायतीच्या ठरावाला देखील कंपनीकडून केराची टोपली दाखवून विनापरवाना बेकायदेशीरपणे नदीच्या पाण्याचा वापर आज अखेरपर्यंत कंपनीकडून उपसा करून चालू आहे . आगामी काळात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे तातडीने हा बेकायदेशीरपणे चालू असलेला पाणीपुरवठा तातडीने व त्वरित थांबवण्याची मागणी गावडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
“ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने कंपनीला सुरु असलेल्या पाण्याबाबत योग्य तो निर्णय तातडीने घेणार आहोत
-आर.आर.दवणे, ग्रामसेवक, शिरसवडी