नवी दिल्ली, दि. 4-रुपयाचे मूल्य घसरून डॉलर वधारल्यामुळे भारताची आयात वाढली आहे. त्याचबरोबर निर्यात अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील व्यापारी तूट वाढून 31 अब्ज डॉलर वर गेली आहे.
या महिन्यात निर्यात एक टक्क्याने कमी होऊन 35 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. तर आयात बऱ्याच प्रमाणात वाढून 66 अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये आयात 46 अब्ज डॉलर होती. डॉलरचे मूल्य वाढत असल्यामुळे भारताला आयात महागात पडत आहे.
व्यापारातील तूट वाढल्यानंतर आज लगेच याचा परिणाम भारतीय रुपयाच्या मूल्यावर होऊन रुपयाचा भाव घसरला असल्याचे दिसून आले. भारत सरकारने निरुपयोगी आयात कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जुलै महिन्यामध्ये सोन्याची आयात कमी होऊन ती केवळ 2.5 अब्ज डॉलर झाली आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात 4.2 अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात झाली होती. भारत सरकारने यावर्षी 470 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठरविले आहे. पहिल्या चार महिन्यांत 156 अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये अपेक्षेप्रमाणे निर्यात वाढण्याची शक्यता असल्याचे वाणिज्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी सांगितले. आपण अतिशय गुंतागुंतीच्या परिस्थितीतून जात असलो तरी व्यापारी तूट अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेली नाही. इतर आशियाई देशाची व्यापारी तूट आपल्यापेक्षा जास्त वाढून त्यांचे चलन कोसळले आहे. मात्र भारताची परिस्थिती त्या तुलनेत समाधानकारक आहे. त्याचबरोबर भारताकडे पुरेसा परकीय चलन असल्यामुळे किमान एक वर्ष तरी भारताला परकीय चलनाच्या बाबतीत कसलाही त्रास होणार नाही,