- विहिरीच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचा काणाडोळा
टाकवे बुद्रुक – आंदर मावळ परिसराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या टाकवे येथील मुख्य बाजारपेठ नजीक असलेल्या सुतार विहिरीत दूषित पाणी असल्यामुळे परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गावात दुष्काळजन्य परिस्थिती असताना महिलाची पाण्यासाठीची होणारी वणवण थांबविण्यासाठी 40-45 वर्षांपूर्वी श्रमदानातून विहिरीचे काम करण्यात आले होते.आता गावात मुबलक पाणीसाठा असल्याने विहिरीचे पाणी वापरात येत नाही. त्यामुळे नागरिकांचे व ग्रामप्रशासनाचे विहिरीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विहिरीतील पाणी दूषित होऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सबंधित विहिरीतील दूषित पाणी काढून विहीर स्वच्छ करून जाळी बसविण्यात यावी, आशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
विहिरी संदर्भात परिसरातील नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन कारवाई करण्यासंदर्भात पहिल्या मासिक सभेत तातडीने निर्णय घेऊ.
– संध्या असवले, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या