मुंबई – रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने नवीन सुविधा सुरू केली आहे. प्रवाशांचे सामान आता त्यांच्या घरापासून थेट आरक्षित सीटपर्यंत पोहोचवले जाणार आहे. पश्चिम रेल्वेने या संदर्भात ट्विट करून माहिती दिली असून ही सुविधा सर्वप्रथम अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर उपलब्ध करण्यात आली आहे. आगामी काळात ही सुविधा सर्वच रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
End to End Luggage/Parcel service by https://t.co/QrU675EYft has been introduced by WR at Ahmedabad Railway Station.
It is the first NINFRIS contract of its kind to be implemented over Indian Railways.#MoveItLikeRailways pic.twitter.com/OxijOHz1ql
— Western Railway (@WesternRly) January 27, 2021
अगोदर नोंदणी करावी लागणार –
प्रवासामधी समानाबरोबरच पार्सल पाठवण्यासाठीही या सेवेचा उपयोग होणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना www.bookbaggage.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच bookbaggage या अॅपच्या माध्यमातूनही प्रवाशांना नोंदणी करता येणार आहे.
सामानाच्या वजन, आकारानुसार शुल्क आकारणी –
रेल्वेने सांगितल्यानुसार, सामानाच्या वजन, आकारानुसार शुल्क आकारले जाणार आहे. ट्रेन निघण्याच्या चार ते पाच तासांआधी प्रवाशांचे सामान घरापासून स्टेशनपर्यंत पोहोचवले जाणार आहे.
विशेष म्हणजे, विमानतळांवरील सामानाप्रमाणे रेल्वेच्या सामानावरही बारकोड स्टीकर लावले जाणार आहे. बारकोड स्कॅन करून प्रवाशांना आपल्या सामानाची माहिती मोबाइलवर मिळणार आले. करोनाचा धोका लक्षात घेता सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाणार आहे.