मुंबई – राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र सरकार अजूनही नुकसान भरपाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
राज्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे तिथे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असे देखील प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले.
राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil यांनी केली आहे. #ओला_दुष्काळ pic.twitter.com/jokDTh5m8H
— NCP (@NCPspeaks) October 27, 2022
दरम्यान, पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मंत्री सत्तार यांनी चहा पिता पिता तुम्ही दारू पिता का, असा अजब सवाल जिल्हाधिकाऱ्यांना केला. या सत्तरांच्या व्हिडीओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादीने देखील मंत्री सत्तार यांचा तो व्हिडीओ फेसबूक आणि ट्विटरवर पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून यातून शेतकऱ्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. या परिस्थितीत त्यांना दिलासा देण्याऐवजी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टी पाहणी दौऱ्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांशी दारूवर चर्चा करणे ही गोष्ट संतापजनक आहे. pic.twitter.com/QCLAUZpbpm
— NCP (@NCPspeaks) October 27, 2022
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून यातून शेतकऱ्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. या परिस्थितीत त्यांना दिलासा देण्याऐवजी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टी पाहणी दौऱ्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांशी दारूवर चर्चा करणे ही गोष्ट संतापजनक आहे. कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्यावरून त्यांची बळीराजाप्रती किती आस्था आहे हे दिसून येते. खरीप हंगामात आणि रबी हंगामाच्या सुरुवातीलाच आलेले शेतकऱ्यांवरील संकट हा अतिसंवेदनशील विषय असून त्याची गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित होते. मात्र कृषी मंत्री बळीराजाच्या दुःखात किती सहभागी आहेत याची प्रचिती त्यांच्या असंवेदशील विधानातून दिसून येते. अशी पोस्ट राष्ट्रवादीने केली आहे.