नगर -करोना आणि चिनी हल्ला अशा दुहेरी संकटात देश सापडला आहे. चिनकडून झालेला हल्ला भारतीय जवानांनी परतून लावण्याचा पराक्रम गौरवास्पद आहे. मात्र, भाजपाच्या केंद्र सरकारची भुमिका अपयश स्पष्ट करणारी असल्याने अहमदनगर शहर कॉंग्रेस केंद्र सरकारचा निषेध करीत आहे, असे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले.
नगर शहर कॉंग्रेस, भिंगार कॉंग्रेस, अल्पसंख्याक विभाग, महिला कॉंग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने चिनी हल्ह्यातील शहीद जवानांना वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांतिक सदस्य शामराव वाघस्कर होते.
केंद्र सरकारची भुमिका कणखर, खंबीर नसल्याने शेजारी राष्ट्र कुरापती काढत आहे. चिनी सैन्याने हडपलेली भारतीय भुमी परत घेण्याची मागणी कॉंग्रेस पक्ष केंद्र सरकारकडे करीत आहे, असे भिंगार कॉंग्रेस अध्यक्ष ऍड.आर.आर.पिल्ले यांनी सांगितले.