नगर, – राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही मोडीत काढून हुकुमशाही सुरु आहे. सरकारच्या या मनमानी कारभारावर शेतकरी, व्यापारी, उद्योजक, नौकारदार यांच्यासह सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत. शेतकऱ्याच्या मालास हमी भाव न देता सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था मोडकळीस आली असून सत्ताधाऱ्यांचे राजकारनापाई याकडे दुर्लक्ष, झाल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांनी केला.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जाणकार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात हरहर महादेव, घरघर महादेव हे संपर्क व जागृती अभियान राबवून नागरिकांना पत्रके वाटण्यात आली. नगर शहरात जुन्या बस स्थानकापासून या अभियानास सुरवात करण्यात आली. शहरात व उपनगरात या अभियानास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी रासपचे शहर जिल्हाध्यक्ष चिमाजी खामकर, अमोल शिरसाठ, अण्णा शिंदे, रमेश भिसे, ओमकार शिंदे, स्वप्नील शिंदे, सतीश गांगर्डे, सुरज लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आहे. यासाठी सरकारला जागे करून व या हुकूमशाही सरकारांविरोधात आवाज उठवण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी रासपने हे अभियान सुरु केले आहे. कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, नगर तालुका, पाथर्डी, शेवगाव व नगर शहरातही या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले.