वाराणसी – उत्तरप्रदेशातील लोकांना विद्यमान राज्य सरकार पुर्ण पसंत असून हेच सरकार कायम राहावे यासाठी जनताच प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
वाराणसीतील खजुरी गावात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले की, विरोधकांना माझ्या विषयी तिरस्कार आहे. त्यामुळेच हे लोक सरकारच्या जनहिताच्या कामाचीही टिंगलटवाळी करतात. केवळ आपल्या विरोधासाठी ते स्वच्छ भारत अभियानालाही विरोध करतात असे ते म्हणाले.
युक्रेनच्या मुद्द्यावरही विरोधक राजकारण करून विरोधकांचे नेते या विषयीच्या अडचणीत भरच घालत आहेत. या लोकांना आम्ही युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याचाही हे लोक तिरस्कार करीत आहेत असे ते म्हणाले.
कॉंग्रेसला फटकारताना ते म्हणाले की, ज्या पक्षाने खादीपासून वर्षानुवर्षे राजकीय फायदा मिळवला त्या पक्षाचे लोक आता खादीचे नावही घेण्यास कचरतात. आमच्या सरकारने खादी आणि योगाला आंतरराष्ट्रीय ब्रॅंड बनवले आहे असा दावाही मोदींनी यावेळी केला.