नवी दिल्ली – करोनामुळे सोशल डिस्टंन्सिग पाळण्यासाठी नागरिक स्वतंत्र वाहन खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे पहिली कार घेणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे मारुती सुझुकी कंपनीने म्हटले आहे.
कंपनीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, समूहाने प्रवास करण्याचे प्रमाण कमी होत आहे. या घडामोडीचा वाहन उद्योगाला लाभ होण्याची आहे. त्यामुळे छोट्या कारचे उत्पादन वाढणार आहे. कार कंपन्यांनी ग्राहकाचे वर्तन कसे असेल या संदर्भात सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात ग्राहक स्वतःचे वाहन असावे या मताच्या असल्याचे दिसून आले आहे.