वैष्णवी कदम
नगर, दि. 20 – वाढती गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यांची पिळवणूक तर होत आहे. पण त्यात सर्वसामान्य भरडला देखील जात आहे. नगर शहरात लागेपाठ दोन खून रस्त्यावर झाले आले आहेत. त्यातून नगरची गुंडगिरी कोणत्या थरात गेली आहेत हे आता सांगायला नको, विशेष म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन ते खूनापर्यंत जात आहेत. याचा अर्थ नगर शहरात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. त्या राजकीय कार्यकर्त्यांना बळ मिळते.
तसेच सत्तेचाही आधार मिळाल्याने वर्चस्वासाठी अशा प्रकारे मुडदे पाडण्याचा प्रयत्न होत आहे.
नागरिकांना दिवसा रस्त्यावर फिरण्याची भीती वाटत आहे. रात्री आठ नंतर रस्त्यावर फिरणारे नागरिक कमी झाली आहे. एवढी दहशत बसली असून नगरची बाजारपेठेत देखील आता शुकशुकाट दिसत आहे. बाहेर गावचे ग्राहक नगरमध्ये खरेदीला येण्यास घाबरत आहे. कधी काय होईल, ते सांगता येत नाही. त्यापेक्षा नगर नका अशी भावना झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती सुधारण्यासाठी आता राजकीय पक्षाच्या नेते मंडळींना पुढाकार द्यावा लागणार आहे.
अन्यथा नगरची बाजारपेठ बकाल होण्यास वेळ लागणार नाही. शहरात गेल्या काही महिन्यांपासून नागरिक असुरक्षिततेची भावना व्यक्त करीत आहेत. पोलीस आपल्या परीने वातावरण सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असले तरी राजकीय पक्षांनी यात सहभाग घेऊन वातावरण सुरळीत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आता आणखी बळी नका आहेत. याची काळजी घेतली पाहिजे.