भोपाळ – लग्न वयाच्या कितीव्या वर्षी आणि कुणाशी करायचं याच काही बंधन नाही. त्यामुळे अनेकदा वयस्कर वरासोबत तरुणींचं लग्न झालेलं आपण अनेकदा पाहिलं आहे. मात्र मध्य प्रदेशातून एक अजबच घटना समोर आली आहे. हे प्रकरण साध नसून पोलिसांनाच यामध्ये हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे.
मध्य प्रदेशातील भिंड गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणातील महिलेची आधी चार लग्न झाली आहेत. या लग्नातून तिला पाच मुलीही आहेत. तिच्या दोन पतींचा मृत्यू झाला आणि दोन पतींनी तिला सोडून दिले. तिचं वय ४५ वर्षं आहे.
महिलेला आता ३० वर्षाच्या मुलाशी प्रेम जमलं आहे. पाच मुलींची आई असलेल्या या महिलेच्या पहिल्या मुलीचं लग्न झालेलं आहे. तिने आणि तिच्या पतीने म्हणजे या महिलेच्या जावयानेच तिची पोलिस स्थानकात तक्रार केली आहे.
दरम्यान महिलेने म्हटलं की, मी माझ्या मुलीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होते. त्याचा राग मनात धरून तिने माझी तक्रार केली आहे. दुसरीकडे ही महिला ३० वर्षाच्या युवकासोबत गेल्या वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. या तक्रारीवर तोडगा काढावा असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.