तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – शब्द ही आपली अभिव्यक्ती असते. समाज म्हणून प्रेमातून प्रेमकडचा मोठा प्रवास कवितेमुळे सुसह्य होते, असे मत कवी नारायण पुरी यांनी व्यक्त केले.
इंद्रायणी महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या कवी संमेलनात कवयित्री कालिका बापट, आरती प्रभू यांच्या कन्या हेमांगी नेरकर, भरत दौंडकर यांनी कविता सादर केल्या. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे आदी उपस्थित होते.
चंद्रकांत शेटे म्हणाले की, मराठी भाषेचा वारसा हा समृद्ध आहे. भाषिक अस्मिता हीच आपली खरी ओळख असायला पाहिजे. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी केले. आभार प्रा. सत्यजित खांडगे यांनी केले.