नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक स्थितीवरून सरकारवर चौफेर टीका करणाऱ्या कॉंग्रेस पक्षावर पलटवार करताना केंद्रीय मंत्र मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे की, केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली एक सशक्त सरकार कार्यरत आहे, ते सरकार रिमोट कंट्रोलवर चालणारे नाहीं ही बाब कॉंग्रेसच्या पचनी पडेनाशी झाली आहे म्हणूनच त्यांच्याकडून सरकारवर टीका सुरू आहे असे त्यांनी म्हटले आहे.
पुर्व लडाख मध्ये चीनने केलेल घुसखोरी, देशाची बिघडलेली आर्थिक स्थिती आणि करोनाच्या वाढत्या केसेस यावरून कॉंग्रेसकडून सरकारवर जो हल्लाबोल सुरू आहे त्यावर बोलताना नक्वी यांनी रिकाम्या भांड्यांचा खडखडाट मोठा असतो उपमा दिली आहे.
आज येथे वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की, सत्तेचा अहंकार आणि सरंजामी मानसिकतेतून कॉंग्रेस अजून बाहेर आलेली नाही. त्यांची ती मानसिकता बदलली जाण्याची शक्यता नाही. ते खुज्या मानसिकतेतूनच सरकार वर टीका करीत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात विविध योजनांद्वारे अल्पसंख्य समाजातील दहा लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नक्वी यांच्या हस्ते आज उत्तरप्रदेशातील रामपुर येथे बहुउद्देशीय समाज मंदिराचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते.