कर्मचाऱ्यांना दिलासा नाहीच; याचिका फेटाळली
मुंबई (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामकाजातून टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुकीच्या कामकाजासाठी टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीसीमध्ये गैर काहीच नाही, असा निर्वाळा देत न्यायालयाने टपाल कर्मचाऱ्यांची याचिका फेटाळून लावली.
आगामी विधानसभा निवडणुकीत प्रथमच टपाल कार्यलयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देण्याच्या निर्णय निवडणूक आयोगा घेतला. त्यानुसार टपाल कार्यालयातील उपलब्ध कर्मचाऱ्यांची संख्या आणि तपशील दाखल करण्याचे निर्देश आयोगाने उप पोस्टमास्टरना दिले.
निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी आणि प्रशिक्षणासाठी काम करण्याच्या उद्देशाने हा तपशील मागविण्यात आल्याने टपाल कर्मचारी संटनेच्या वतीने उच्च न्यायालयाने या आयोगाच्या नोटीसीला उच्च न्यायालयात आव्हन दिले. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.