मुंबई – 20 वर्षांपूर्वी मुंबईच्या लोकसंखेची वाढ राष्ट्रीय लोकसंखेच्या वाढीपेक्षा कमी होती, मात्र जागतिकीकरणानंतर औद्योगिकरणासोबत शहरे रुंदावली, रोजगार देखील वाढला त्यामुळे स्थालांतरन वाढले मात्र कुटुंबांची आर्थिक प्रगती त्या गतीने वाढली नाही. तेव्हा मुंबई सारख्या शहरात सुद्धा सार्वजनिक वाहतुकीची साधने उपलब्ध असूनही पायी चालणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
बसेस, मेट्रो, लोकल, खाजगी अशी सर्व वाहने व रस्ते सुद्धा सदैव भरून दिसतात. त्यात लोकांचा कल जास्तीत जास्त दुचाकीकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे सिटीबसेसची संख्या वाढणे गरजेचे आहे असे मत परीसर आयोजित “Engage for Environment” सिरिजच्या मुंबई मधील वेबिनार मध्ये राज्यातील नामवंत तज्ञांनी मांडले. सदर वेबिनार दि. 18 जून रोजी 4 वाजता संपन्न झाला.
परिसर तर्फे आयोजित, मार्च 2020 पासून “लाख को पचास” ही सिटीबसेसवर आधारित मोहीम राज्यभर सुरू आहे. सदर वेबिनारमध्ये प्रा. सुधाकर येडला – पर्यावरण विभाग इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेवलपमेंट रिसर्च, गोपाल दुबे- TISS, डॉ. एस.एल. धिंग्रा, (निवृत्त, इन्स्टिट्यूट चेअर, प्रोफेसर ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम इंजिनीअरिंग, आयआयटी पवई), प्रसाद शेट्टी, (अर्बन रिसर्च नेटवर्क), मैत्री पुराणिक – विद्यार्थी TISS, उपस्थित होते.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व पर्यावरण विषयाला केंद्रस्थानी ठेवत चर्चा झाली. सदर चर्चेत प्रा. सुधाकर येडला यांनी मुंबई जेवढी झपाट्याने वाढत आहे, त्यापेक्षा किती तरी पटीने ती जलद होत आहे असे सांगितले. मात्र त्यामानाने बसेस मात्र जलद झाल्या नाही हे तितकेच खरे आहे व त्यामुळे लोकांचा कल हा खाजगी वाहनांकडे वाढलाय अस म्हणाव लागेल. तेव्हा वाढत्या शहरांना शहरी बसेसची सुद्धा तेवढीच आवश्यकता आहे असे मत त्यांनी मांडले.
तसेच गोपाल दुबे यांनी शहरी वाताहत म्हणजे फक्त प्रवास नव्हे तर तेथील लोकांनी शाश्वत विकासाकडे मार्गक्रमण करतांना अगदी शेवटच्या माणसाला सुद्धा त्याच्या जाण्याच्या ठिकाणी पोहचविण्याचे काम या प्रवासात व्हायला हवे. हा प्रवास स्वस्त अथवा मोफत असणे गरजेचे आहे तेव्हाच लोक पर्यावरण आधारित तत्वे स्वीकारतील, असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले.
सुंदरलाल धिंग्रा व प्रसाद शेट्टी यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडत सांगितले कि, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची योजना बघता ज्यांनी ही योजना निर्माण केली त्यांनी कधीच लोकांच्या बरोबरीने सिटीबस मध्ये प्रवास केला नसावा, म्हणूनच या योजना लोकांच्या मतांना पूरक आहेत असे दिसत नाही.
शहरांची लोकसंख्या व लोकांच्या कामाची क्षमता व अनेक उदहयोग व्यवसाय आपल्याला वाढताना दिसत आहेत, मात्र लोकांच्या प्रवासाचे काय ? जेवढे जास्त कामगार तेवढ्याच लोकांना कामावर रोज जाण्यासाठी वाहने लागणार तेव्हा त्यांची संख्या वाढणे सुद्धा स्वाभाविक आहे. मात्र ही वाहने खाजगी नसावीत त्यासाठी सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे.
10 वर्षापूर्वी मुंबईतील बेस्टची विश्वासहार्यता व आजच्या बेस्टची दशा बघता सार्वजनिक वाहतुकीची काय अवस्था आहे हे आपणा सर्वाना चांगले माहिती आहे. मैत्री पुराणिक यांनी ‘आरे’ प्रकरणात कशा पद्धतीने मुस्कटदाबी झाली मात्र पर्यावरण कार्यकर्त्यानी न थांबता सदर प्रकरणात यश मिळविले तेव्हा आता सार्वजनिक वाहुतुक क्षेत्रात देखील अशाच लढ्यांची गरज आहे असे मत या प्रसंगी मांडले.
लाख को पचास ही मोहीम राज्यभरात चालू असून आता पर्यंत 10 हजार लोकांनी सहीच्या माध्यमातून या मोहिमेला समर्थन दिले असून राज्यातील 80 पेक्षा जास्त संस्था या मोहिमेच्या समर्थनात आहे. तसेच सदर वेबिनार मध्ये फक्त मत मांडणी झाली नसून संशोधकांनी शाश्वत विकासाची पावती देत असतांना सरकारला घेऊन सिटीबस, सार्वजनिक वाहतुकीच्या सुधारणे साठी कशा पद्धतीने चालना देता येईल यावर चर्चा करण्यात आली.
सदर वेबिनारचे सूत्रसंचालन स्वाती पाठक यांनी केले, तसेच कार्यक्रमाचा सार परिसर चे प्रोजेक्ट डायरेक्टर रणजित गाडगीळ यांनी केले. आभार प्रदर्शन परिसरचे संस्थापक सुजित पटवर्धन यांनी केले, विकास तातड व संस्थेचे इतर सहकारी तसेच परिसरचे सर्व शहर प्रतिनिधी या चर्चेला उपस्थित होते.