मुंबई – ईडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं. हातातल्या बाहुलीप्रमाणे ईडीला नाचवलं जात आहे. स्वतंत्रपूर्व काळातदेखील इतका अतिरेक झाला नाही. त्यामुळे ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी आहेत? अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोदींवर टीका केली आहे.
एका वाहिनीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, भाजपचे लोकप्रतिनिधी गंगास्नान करून आले आहेत का? त्यांच्यावर कारवाई का नाही? ईडीचे ऑफिस आता मोदींच्या घरून चालतं आहे. ते पंतप्रधान कार्यालयातून चालत नाही असं दिसतं. गैरफायदा घेणारं हे पहिलं सरकार आहे.
ईडीच्या प्रमुखांना काही इमानी इभ्रत काही जिवंत असेल आणि भारताचे नागरिक असाल तर त्यांनी सांगा की ते मोदीचे गुलाम आहेत की भारतीय घटनेचे अधिकारी आहेत? एका तरी भाजपच्या नेत्यावर, आमदारांवर चौकशी झाली असेल असे एखादे उदाहरण सापडलं नाही. अतिरेक झाला तर याचा दुष्परिणाम सरकारला भोगावा लागेल असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.
दरम्यान, ज्या पद्धतीने सगळं सुरू आहे हे चालूच राहणार. मात्र, याचा परिणाम कुठे होणार नाही. हे सर्व मुरब्बी राजकारणी आहेत. हे भांडताना दिसत असले तरी त्याचा काही फरक पडणार नाही. सत्तेवर तेव्हा त्या बाहेरच्या लोकांवर त्याचा काही परिणाम होणार नाही असंही यावेळी बच्चू कडू म्हणाले.