नवी दिल्ली : कोरोनाच्या बाधेमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या रविवारी सातवर पोहोचली. महाराष्ट्रात दुसऱ्या तर बिहारमध्ये पहिल्या बळीची नोंद झाली. बिहारमध्ये कतारहून आलेल्या एका प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. बिहारमध्ये नोंदवलेला हा पहिला बळी आहे. नालंदा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणखी एका बाधिताची नोंद झाली.
दरम्यान रविवारी सुरतमध्ये मृत्यू झाला. गुजरातमध्ये हा पहिला बळी ठरला आहे. त्याच्यावर ऊपचार सुरू होते. त्यांची मूत्रपिंडे निकामी झाली होती. मात्र त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
महाराष्ट्रात दुसऱ्या बळीची नोंद झाली. मुंबईत 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याशिवाय दिल्ली, पंजाब आणि कर्नाटक येथे प्रत्येकी एक जणाचा मृत्यु झाला आहे. बिहारमधील मृत तरूणाला मुत्रपिंडाचे विकार होते. मात्र देशातील पहिल्या तरूणाचा मृत्यू असल्याने त्याची चिंता वाढली आहे.