पुणे -गायक, वादक, अभिनेते, चित्रकार, शिल्पकार यांनी निर्माण केलेल्या कलाकृतींमध्ये आपण आजवर गुंतून पडलो आणि वाईट गोष्टींकडे आपले दुर्लक्ष झाले. कलाकारांमुळे आपला देश वाईट मार्गाला गेला नाही. शेजारी देशाचे उदाहरण त्यासाठी बोलके आहे. कलाकार नसते तर या देशात अराजक माजले असते, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केले.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित अशोकपर्व’ या महोत्सवात ठाकरे यांच्या हस्ते सराफ यांचा सत्कार केला. आपल्याला कलाकारांचे महत्त्व पुरेसे उमगत नाही. परदेशात कलाकारांच्या नावाने विमानातळे असतात आणि आपल्याकडे फक्त चौक असतात.
सराफ परदेशात असते तर त्यांचा सत्कार करायला पंतप्रधान आले असते. इतकेच काय, ते दक्षिणेत असते तर आत्तापर्यंत मुख्यमंत्री झाले असते. निवेदिता सराफ यांचे भाषण झाले. अशोक सराफ यांनी सत्काराला उत्तर दिले.