नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. संपूर्ण देशात एकाच पद्धतीने लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शेतकरी, कामगार वर्ग, श्रमिक आणि व्यापाऱ्यांसाठी न सांगता येणारे दु:ख आणि समस्या घेऊन आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
किसानों,श्रमिकों,दिहाड़ी मज़दूरों,व्यापारियों,सभी को एक पैमाने से नहीं देखा जा सकता।पूर्ण लॉकडाउन कई वर्गों के लिए विपदा बन गया है।देश को “स्मॉर्ट” समाधान की ज़रूरत है:बड़े स्तर पे टेस्ट,वाइरस हॉटस्पॉट की पहचान और घेराव,बाक़ी जगहों पर सावधानी से धीरे-धीरे काम-काज शुरू होना चाहिए।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 13, 2020
राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या समस्येतून आपण स्मार्ट पद्धतीने मार्ग काढणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त चाचण्या करून हॉटस्पॉट्स शोधले पाहिजेत. तर अन्य ठिकाणी सावधगीरी बाळगून हळूहळू कामकाज सुरू केले पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले. “शेतकरी, श्रमिक, कामगार वर्ग, व्यापारी या सर्वांकडे एकाच पद्धतीने पाहता येणार नाही.
काही लोकांसाठी हे लॉकडाउन समस्या बनली आहे. देशाला स्मार्ट पद्धतीने तोडगा शोधण्याची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणात चाचण्या, करोनाचे हॉटस्पॉट ओळखणे आणि अन्य ठिकाणी खबरदारी घेऊन कामकाज हळहळू सुरू करण्याची आवश्यकता आहे,” अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.