नवी दिल्ली : देशात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 606वर पोहोचली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सायंकाळी सांगितले. त्यात 43 परराष्ट्रीय नागरिकांचा समावेश आहे. देशात मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे. योगायोगाने देशात 21 दिवस लॉकडाऊनची सुरवात बुधवारीच झाली.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित असून त्यांची संख्या 128 वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ केरळात 109 जणांना लागण झाली आहे. मध्यप्रदेशात बुधवारी उज्जैन येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील सर्वात स्वच्छ शहर असणाऱ्या इंदूरमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ झाली. तेथे चार पॉझिटिव्ह सापडले. उज्जैन आणि भोपाळमध्येही बाधित आढळल्याने तेथे कोरोनाग्रस्तांची संख्या 15 वर पोहोचली.
गुजरातमध्ये आज तीन नवे बाधित आढळल्याने तेथे कोरोनाग्रस्तांची संख्या 38 वर पोहोचली, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. तेथे आरोग्य खात्याने एक कोटी लोकांचे सर्वेक्षण केले आहे.
राज्य निहाय बाधितांची संख्या : आंध्र प्रदेश 9, बिहार 4, छत्तिसगढ 1, दिल्ली 31, गुजरात 38, हरियाणा 28, हिमाचल प्रदेश 3, कर्नाटक 41, केरळा 109, मध्य प्रदेश 14, महाराष्ट्र 128, ओडिशा 2, पुदुचेरी 1, पंजाब 29, राजस्थान 36, तामिळनाडू 18, तेलंगणा 35, चंदिगढ 7, जम्मू काश्मिर 7, लडाख 13, उत्तर प्रदेश 37, उत्तराखंड 4, प. बंगाल 9