औंध – “स्थानिक जनतेला प्राथमिक नागरी सुविधा पुरवणे हे लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचे कर्तव्यच आहे.परंतु यासह सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पुरक सुविधाही पुरवल्या गेल्या पाहिजेत” असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या विकास निधीतून नव्वद लाख रुपये खर्चातून बाणेर सर्वे क्रमांक ५४ रोहन लेहर सोसायटी जवळ मोहन नगर येथील कै.बाळकृष्ण गुलाबराव तापकीर या उद्यानाचे उदघाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर, ज्ञानेश्वर तापकीर, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर , पुनित जोशी, राहुल कोकाटे, प्रकाशतात्या बालवडकर , लहू बालवडकर , सचिन पाषाणकर ,शिवम सुतार, प्रभाग अध्यक्षा उमा गाडगीळ , गुलाबराव तापकीर, संजय पाडाळे,काळूराम गायकवाड,शरद भोते, सचिन दळवी, संतोष तापकीर, प्रकाश तापकीर, दीपक तापकीर ,मयुर भांडे,अर्जुन शिंदे तसेच परिसरातील पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले ‘बाणेर भागातील भाजपचे नगरसेवक हे स्थानिक संदर्भ शोधून प्रत्येक ठिकाणी योग्य व्यक्तींची नावे देऊन त्या त्या व्यक्तींचा योग्य सन्मान करत आहेत हि आनंदाची बाब आहे.तसेच प्राथमिक सुविधा पुरवतानाच येथील नागरिकांच्या आणखी गरजा ओळखून इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावेत.’नव्वद लाख रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या या उद्यानात लहान मुलांसह सर्व वयोगटातील नागरीकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.यावेळी पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेले नागरिक व वसुंधरा अभियान संस्थेसह इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक करताना भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी सांगितले की, विकासाने परिपुर्ण बाणेर च्या हायवे जवळील पश्चिम भागात सोयी सुविधांची कमतरता होती. याची खंत नागरिक व्यक्त करत होते. हि खंत दूर करण्याचा उद्देश समोर ठेवून या भागामध्ये सर्व नागरिकांना विचारात घेऊन नागरिकांना हव्या असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणुनच त्यांना हक्काचे उद्यान ऊपलब्ध करुण दिले आहे. अशीच विविध विकास कामे सुरूच राहतील.
यावेळी बोलताना नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सांगितले की, नागरीकांना हवे असणारे नागरिकांना हवे असणारे सर्व सोयी सुविधा आणि संपन्न असे नागरिकांना विचारात घेऊन तयार केलेले उद्यान आहे. नागरिकांना गार्डनमध्ये हवा असणारा प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला गेला आहे. निश्चितच मोठ्या आनंदात आणि उत्साहात नागरिक ह्या उद्यानाचा वापर करतील अशी अपेक्षा आहे.