शिक्रापूर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही कारणामुळे शिवनेरीवर देखील येऊ शकले नाही त्यामुळे लवकरच शिवनेरीवर तसेच वढू बुद्रुक येथील छत्रपतींच्या समाधी स्थळावर देखील मुख्यमंत्री येतील, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या 333 व्या पुण्यतिथी निमित्त समाधीवर नतमस्तक होण्यासाठी आढळराव पाटील आले असता ते बोलत होते. ते म्हणाले, येथील भूमी महाराष्ट्राला प्रेरणा देणारी असून छत्रपती संभाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली आहे. सध्या राज्य सरकारने मोठा निधी येथील स्मारकासाठी दिलेला असल्याने येथील स्मारकाचा मोठा विकास होणार आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबत बोलताना आढळराव पाटील म्हणाले, निवडून आल्यानंतर ते येथे समाधी स्थळावर एखादेवेळी आले असतील. त्यांनी फक्त निवडणुकीच्या प्रचारापुरताच छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. त्यांना येथील काही घेणे नाही.