मुंबई – बीसीसीआयच्या घटेतील आर्थिक हितसंबंधांचा मुद्दाच नव्हे तर घटनेतील सर्व तरतुदीच अनाकलनिय आहेत, एका क्रिकेट मंडळाची वृत्ती इतकी कोतेपणाची कशी असू शकते, अशा शब्दात भारतीय संघाचे माजी कसोटीपटू व समालोचक रवी शास्त्री यांनी बीसीसीआयच्या घटनेवर ताशेरे ओढले आहेत.
आयपीएल स्पर्धेचा यंदाचा 15 वा मोसम आहे. त्यातील गेली 11 वर्षे मी समालोचन केले आहे. पण बीसीसीआयच्या अनाकलनिय घटनेतील कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या कलमामुळे मी गेल्या पाच वर्षात समालोचन करू शकलो नाही. माईकच्या मागे राहून आयपीएलमध्ये समालोचन करणे माझ्यासाठी आनंददायी आहे. मात्र, बीसीसीआयच्या तरतुदी त्रासदायक ठरत आहेत, अशीही टीका शास्त्री यांनी केली आहे.