नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचे दिसत आहे. कारण तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षात गोंधळ उडाला आहे. कारण आता २४ तासातच तृणमूलला दुसरा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सत्तारुढ तृणमूल काँग्रेसचे पाच नेते शनिवारी भाजपामध्ये दाखल झाले. त्यावेळी बंगालमधील एका सभेत तृणमूल काँग्रेसचे नेता मदन मित्रा यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ते प्रचार सभेत म्हणाले, “मोदी या शब्दाचा अर्थ ‘लोकशाहीची हत्या’ असा होतो. तुम्ही जर आम्हाला दूध मागितलं तर आम्ही खीर देऊ पण बंगाल मागितलं तर तुम्हाला चिरुन टाकू,” असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर जळजळीत टीका केली आहे.
दरम्यान. ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणूक नंदीग्राममधून लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. नंदीग्राम हा शुभेंद्रू अधिकारी यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे यंदा नंदीग्रामची निवडणूक लक्षवेधी होणार आहे.