Thackeray group | Election Commission । Uddhav Thackeray – लोकसभेच्या वेळापत्रकाच्या घोषणेसह आदर्श आचारसंहिता देशात लागू झाली असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी निवडणुक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे.
निवडणूक आयोगाने आपली प्रतिष्ठा गमावली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या टप्प्यात पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघामध्ये मतदान घेण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल त्यांनी केला. ( Uddhav Thackeray )
निवडणुका १ जूनपर्यंत चालतील आणि ४ जूनला निकाल जाहीर होतील. याचाच अर्थ ही प्रक्रिया अडीच महिने चालणार आहे. निवडणूक आयोगएवढा अतिरिक्त वेळ घेऊन बंद दरवाजाआड कोणाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
आम्ही जसा सुप्रिम कोर्टाचा आदर करतो तसा आम्ही निवडणूक आयोगाचाही आदर करतो कारण ती एक स्वायत्त संस्था आहे, पण या संस्थेने तिचा सन्मान गमावला आहे, पण तरीही, आम्ही निवडणूक लढवणार आहोत असे ते म्हणाले. ( Thackeray group | Election Commission )