पुणे – जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी (दि. 28) जिल्ह्याने त्रिशतकी आकडा पार केला असल्याने काळजी घेण्याची नितांत गरज झाली आहे.
यात भोर, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यांमध्ये दिवसागणिक वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येमुळे प्रशासनाची धावाधाव होत आहे. तर हे तालुके सध्या करोनाच्या हॉटस्पॉटच्या दिशेने आगेकुच करीत असल्याने जिल्ह्यात “टेन्शन’ वाढले आहे.
तरी नागरिकांनी आपल्यासह कुटुंब, गावांची काळजी घेण्याबरोबरच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केल्यास करोनाची साखळी तोडण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.