पुणे – अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येच्या दिशेने सरकत आहे. त्याचा परिणाम पुन्हा राज्यातील वातावरणावर होत आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार सुरू आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही भागांत सकाळी हवामान अंशत: ढगाळ होते. तर, खानदेश व विदर्भात कोरडे होते. सोमवारपासून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 5 ते 6 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी अनेक ठिकाणचे किमान तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते.