मुंबई – कर्णधार हरमप्रीत कौरच्या (54) शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या महिला संघाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 114 धावा केल्या. भारताने तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.
भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची पहिली विकेट २७ धावांवर पडली. 22 धावा करून शती राणीला पूजा वस्त्राकारने आउट केले. १७ धावांवर शमीमा सुलतानाला मिन्नू मणीने जेमिमाच्या हातून झेलबाद केले.भारताकडून तीन गोलंदाजांनी विकेट घेतल्या. पूजा वस्त्राकर, शेफानी आणि मिन्नू मणी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दोन फलंदाज धावबाद झाले.
बांगलादेशने दिलेल्या 115 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्मा पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धाव न घेता बाद झाली. स्मृती मानधना आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी डावाची धुरा सांभाळली. संघाची धावसंख्या २१ धावांवरच पोहोचली होती की जेमिमा (११) ही पॅव्हेलियनमध्ये परतली.
For her match winning knock of 54*, Captain @ImHarmanpreet is adjudged Player of the Match as #TeamIndia win by 7 wickets.
Scorecard – https://t.co/XfPweXxk85… #BANvIND pic.twitter.com/WIdChT6HMT
— BCCI Women (@BCCIWomen) July 9, 2023
त्यानंतर स्मृती ३० धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यास्तिका भाटियाने सावध खेळ करत संघाला विजयापर्यंत नेले. बांगलादेशकडून सुलताना खातूनने दोन विकेट घेतल्या. मारुफा एक्टरला एक विकेट मिळाली.