बार्बाडोस :- वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सेकंड बेंचला संधी देणार असे म्हणत असलेचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.
संजू सॅमसनला वारंवार संधी देऊनही त्याच्या कामगिरीत चमक दिसत नाही मग महाराष्ट्राच्या ऋतूराज गायकवाडवरच सातत्याने अन्याय का, त्याला संधी कधी देणार असा सवालही चाहत्यांनी उपस्थित केला आहे.
पहिला सामना भारताने जिंकला मात्र, दुसरा सामना गमावला. या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांना विश्रांती देत संजू सॅमसन व अक्सर पटेल यांना संधी दिली. मात्र, हे दोघेही साफ अपयशी ठरले.
गेल्या मोसमापासून ऋतूराज सातत्याने सरस कामगिरी करत आहे. त्याने आयपीएल स्पर्धेतही सातत्य दाखवले आहे. तरीही त्याला जीतकी संधी मिळायला हवी होती ती मिळत नाही. सॅमसन तसेच अन्य काही खेळाडूंना वारंवार संधी दिली जात आहे मात्र, त्यांच्या कामगिरीत सुधारणा झालेली नाही. ऋतूराज केवळ पर्यटक म्हणून वेस्ट इंडीजला गेला आहे का, असा सवालही चाहत्यांनी केला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी सॅमसनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्याला आपली निवड सार्थ ठरवण्याची नामी संधी होती मात्र, त्याने बेजबाबदारपणे फलंदाजी करत आपली विकेट गमावली. त्याला यापुढे आणखी कीती संधी देत राहणार. सॅमसनऐवजी ऋतुराज गायकवाडचा संघात समावेश करता आला नसता का, असा सवालही चाहत्यांनी केला आहे.
ऋतूराजला विविध स्पर्धांसाठी तसेच मालिकांसाठी भारतीय संघात निवडले जाते मात्र, प्रत्यक्ष खेळण्याची संधीच दिली जात नाही. संघात सलामीवीरांचे पर्याय खूप आहेत परंतू रोटेशननूसार प्रत्येकाला संधी दिली गेली तरच त्यांना सामना खेळण्याचा अनुभव मिळेल. त्यांना संधीच दिली नाही तर आगामी विश्वकरंडकासाठी संघ निवड आणखी कटीण बनेल. त्याच त्याच खेळाडूंना खेळवले जाणार असेल तर मग सेकंड बेंचवरील खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांसाठी तरी मोकळे करा, असा सल्लाही काही चाहत्यांनी द्रविड यांना दिला आहे.
द्रविडच लक्ष्य..
राहुल द्रविड यांनी सातत्याने सेकंड बेंचला संधी देत राहणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनीही सेफ गेम करत विजेता संघच कायम ठेवण्याचे सत्र अवलंबले. दुसरा सामना गमावल्यावर आता टीका जास्त होऊ लागली आहे. रोहित व कोहलीला विश्रांती देताना अन्य खेळाडूंचा जीतका विचार करता तेवढा ऋतूराजचा कधी करणार असा तिरकस सवाल चाहत्यांनी केला आहे.