मदूराई – तमिळनाडूमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मदुराईच्या अनेक भागात पाणी साचले आहे, त्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम होऊ लागला आहे.
मुसळधार पावसामुळे निलगिरीच्या कुंजपनई भागात भूस्खलन झाले. त्याचवेळी, निलगिरी माउंटन रेल्वेच्या मेट्टुपलायम-कुन्नूर विभागातील कल्लर-अड्डेर्ली दरम्यानच्या ट्रॅकखाली असलेली माती वाहून गेली. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पावसामुळे मदुराई, कोईम्बतूर, दिंडीगुल, तिरुपूर आदी जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.