Tamil Nadu Accident : तामिळनाडूमध्ये दोन बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अपघातात 60 जण गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे. जखमींना तिरुपत्तूर जिल्ह्यातील वानियांबडी सरकारी रुग्णालयात आणि वेल्लोरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे चेन्नई-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दोन बसचा समोरा समोर झालेल्या धडकेत किमान पाच जणांचा मृत्यू झाला.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दहा रुग्णवाहिकांमधून जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ३२ वर्षीय रितिका, वानियांबडी येथील ३७ वर्षीय मोहम्मद फिरोज, एसईटीसी बसचालक के. एलुमलाई येथील बी अजित आणि चित्तूर यांचा जागीच मृत्यू झाला, तर ओम्निबस चालक एन सय्यद यांचा नंतर मृत्यू झाला. “हा अपघात पहाटे 4 च्या सुमारास झाला. सरकारी बस आणि ऑम्निबसची धडक होऊन लोकांचा मृत्यू झाला.” अशी माहिती पोलिसांनी दिली.