Tamil Nadu – श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेतलेल्या तामिळनाडूमधील 22 मच्छिमारांची आज श्रीलंकेकडून सुटका करण्यात आली. हे सर्व मच्छिमार बोटीने रामेश्वरम येथे आले आहेत.
तामिळनाडूच्या मच्छिमारांची बोट खराब हवामानामुळे समुद्रामध्ये भरकटली होती आणि श्रीलंकेच्या सागरी हद्दीमध्ये शिरली होती. श्रीलंकेच्या नौदलाने शनिवारी या मच्छिमारांना पकडले होते आणि त्यांच्या बोटीही ताब्यात घेतल्या होत्या.
या मच्छिमारांची नंतर चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर या मच्छिमारांच्यावतीने मच्छिमारांच्या संघटनेने केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेतली होती आणि त्यांना या मच्छिमारांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती.
त्यानंतर सितारामन यांनी पररा÷ट्र सचिवांकरवी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांशी संवाद साधला. त्यानंतर या मच्छिमारांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले. सर्व 22 मच्छिमार भारतात सुखरुप परतल्यानंतर त्यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेऊन त्यांना मदतीबद्दल घधन्यवाद दिले.