T20 worldCup : 5 जानेवारीला ICC ने T20 वर्ल्ड 2024 चे वेळापत्रक जाहीर केले. भारताला इतर चार संघांसह अ गटात स्थान देण्यात आले आहे. १ जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील पहिल्या सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होणार आहे.
भारतासोबतच, पाकिस्तान ( IND vs PAK ) यांनाही अ गटात स्थान देण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. यानंतर शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान पहिल्यांदाच या विश्वचषकात भारतासोबत भिडणार आहे. २०२२ च्या विश्वचषकात भारताला इंग्लंडकडून अखेरचा पराभव स्वीकारावा लागला होता.
इंग्लडसोबतच्या पराभवनानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकही टी-२० सामना खेळलेला नाही. अशा स्थितीत या भारतीय जोडीला विश्वचषकात पुनरागमन करण्याची संधी देण्याचा आग्रह क्रिकेट तज्ज्ञांनी धरला आहे. अशात भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी रोहित आणि कोहलीबाबत महत्वाची टिपण्णी केली आहे.
एका क्रीडा वाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले, “गेल्या दीड वर्षांपासून विराट कोहलीचा फॉर्म उत्कृष्ट आहे. त्याने एकदिवसीय विश्वचषकातही चमकदार कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषकात कोहलीच्या फलंदाजीवर कोणताही वाद होऊ नये. याशिवाय रोहित आणि विराट हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. म्हणुनच ही जोडी भारतासाठी ड्रमकार्ड ठरेल असा त्यांचा अंदाज आहे.
विराट-रोहितचा संघाला फायदा होईल
कधी कधी तुम्ही 35-36 वर्षांचे असता, तुमची गती कमी होऊ लागते, तुमची गोलंदाजी क्षमताही कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाबाबत प्रश्न असू शकतात आणि त्यांना कुठे ठेवावे, परंतु अशा परिस्थितीत दोघांनाही कोणतीही अडचण नसावी कारण हे दोघेही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत.असं गावसकर यावेळी म्हणाले.
ड्रेसिंग रुममधील त्याच्या अनुभवाशिवाय मैदानावरील त्याचा सहभाग खूप महत्त्वाचा असेल. कर्णधार कोण असेल हे आम्हाला माहीत नाही, पण जो कोणी असेल, त्यांना रोहित शर्माचा नक्कीच फायदा होईल.