नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असून यात मोठी घडामोड समोर आली आहे. भाजपने सूरत (पूर्व) येथील आपच्या उमेदवार कंचल जरीवालाचे अपहरण केल्याचा आरोप आप नेते मनीष सिसोदिया यांनी केला आहे. शेवटच्या त्या आरोच्या कार्यालयात दिसल्या असून त्यांच्या गायब होण्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला आहे.
सिसोदिया यांनी आज प्रसारमाध्यमांशी या विषयावर संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ‘आप’च्या उमेदवाराचा अर्ज फेटाळण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यांना नुकतेच रिटर्निंग ऑफिसरच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. सिसोदिया म्हणाले, कांचन जरीवाला यांना ५०० हून अधिक पोलिसांनी घेरले आहे, उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. यावेळी सिसोदिया यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. सिसोदिया म्हणाले की, जे काही घडत आहे ते निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत असून या प्रकरणी मी निवडणूक आयुक्तांकडे भेटीची वेळ मागितली आहे. असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
#WATCH | Gujarat: AAP candidate from Surat (East) from Gujarat, Kanchan Jariwala, takes back his nomination after he was allegedly kidnapped last evening pic.twitter.com/E1vqqkveNi
— ANI (@ANI) November 16, 2022
तसेच, सिसोदिया यांनी आम आदमी पक्षावर तिकीट विकल्याचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले, ‘आप’मध्ये तिकिटे विकली जात नाहीत. तिकिटासाठी कुणी पैसे दिले आणि पैसेही घेतले, पण तिकीट विकले गेले नाही. यावरून ‘आप’मध्ये तिकिटांची विक्री होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ते म्हणाले, मी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी करतो.
दरम्यान, आपच्या उमेदवार कंचन जरीवाला यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी कंचन जरीवाला यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, गुंड आणि पोलिसांच्या बळावर उमेदवारांचे अपहरण करून त्यांचे अर्ज परत केले जात आहेत. सार्वजनिक गुंडगिरीचा असा प्रकार भारतात कधीच पाहायला मिळाला नाही. मग निवडणुकीचा अर्थ काय? मग लोकशाही संपली का ? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.