Supriya Sule – मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा ऐरणीवर आला आहे. गावोगावी सरकार व विविध राजकीय नेत्यांच्या विरोधात रोष तयार होऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक गावांनी खासदार, आमदारांसह नेत्यांना गावात प्रवेश बंदी असलेले जाहीर फलक लावून त्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
अशात पुण्यातील नवले ब्रीज वर जाळपोळ चालू आहे, तसेच आंदोलकांकडून घोषणाबाजी चालू आहे. मराठा आदोलकांकडून टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. त्यामुळे नवे पुलाजवळील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
आंदोलकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टायर जाळले असून काही वाहनांना आग लावले असल्याचे देखील वृत्त आहे. यामुळे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. ही परिस्थिती पाहून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “नवले पुलाजवळ जाळपोळ करण्यात आली आहे. त्यासाठी मी सर्वांना शांततेचं आवाहन करेन. राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हे गृहमंत्री देवेंद्र फ़डणवीसांचं अपयश आहे. आताच नाही तर जालन्याच्या घटनेपासून हे सुरू आहे.
जालना, बीड नंतर ड्रग्स, प्रकरणदेखील समोर आलं आहे. मात्र हे सरकार ईडी, सीबीआय, पक्ष फोडणे, घरं फोडण्यात व्यस्त आहे. सामान्यांसाठी या ट्रिपल इंजिन अणि खोके सरकारला वेळ नाही आहे. सरकारने जरांगे पाटलांना 40 दिवस सांगून जरांगे पाटलांची फसवणूक केली.
ट्रीपल इंजिन सरकारने राजीनामा दिला पाहिजे. सध्य़ाची राज्यातली परिस्थिती बघितली तर गृहमंत्री या सगळ्यांला जबाबदार आहेत. मुख्यमंत्री यांनी 40 दिवसात देऊ, असा शब्द दिला. सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं. त्यांनी खोटं कशाला बोलायचं? त्यांनी चारही समाजाची फसवणूक केली’. असं देखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.