पुणे – भारतासारख्या देशाला प्रगतीसाठी हजारो उच्चशिक्षित तरुणांची गरज आहे. भारतात आज घडी सात लाख प्राध्यापक अभियांत्रिकी व तत्सम महाविद्यालयात कार्यरत आहेत. आधुनिक जगात दिवसेंदिवस संशोधनाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान वापरात येऊ लागले आहे. अशा नवनवीन तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.आदित्य अभ्यंकर यांनी व्यक्त केले. ते झील महाविद्यालयामध्ये एआयसीटीई प्रायोजित दोन आठवडीय इंटरनेट ऑफ थिंग्स अँप्लिकेशन डेव्हलपमेंट युजिंग रासबेरी पाय अंड पायथोन प्रोग्रामिंग याविषयावरील प्राध्यापक विकास कौशल्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
सदर शिबिराचे आयोजन झील महाविद्यालयातील संगणक विभाग, माहिती तंत्रज्ञान व अणुविज्ञान आणि दूरसंचार यांनी दिनांक ३ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१९ कालावधीत केले होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. जयेश काटकर, संस्थेचे संकुल संचालक प्रा. प्रदीप खांदवे, अमोल नितवे ईएसडी लीड, आर.पी.जि फाऊंडेशन हे उपस्थित,होते.
इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) च्या प्रभावामुळे वर्ष २०२० पर्यंत साधारणतः तीन हजार कोटी उपकरणे एकमेकांना जोडली जाण्याचा अंदाज आहे. स्मार्ट शहरांच्या विकासात आयओटीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भविष्यात आयओटीमुळे शहरी जीवनात आमूलाग्र बदल होणार आहेत. या सर्व विषयांच्या अनुषंगाने आयओटी या विषयातील तज्ज्ञांनी सर्व सहभागी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे अधिष्ठाता शैक्षणिक विभाग डॉ. सुरेश शीरबहाद्दूरकर यांनी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजित काटे यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल उपस्थितांना माहिती दिली. या शिबिराच्या आयोजनासाठी समन्वयक डॉ.सुरेश शीरबहादुरकर तसेच सह-समन्वयक डॉ.सुनील सांगवे, विभाग प्रमुख, संगणक अभियांत्रिकी डॉ.योगेश गुरव, विभाग प्रमुख माहिती-तंत्रज्ञान व प्राध्यापिका स्मिता भोसले अनु व दूरसंचार प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा.प्रकाश क्षीरसागर, प्रा.राहुल भोळे, प्रा.प्रणाली नीजोशी, प्रा.अनुराधाये नकीकर, डॉ.स्वप्नाजा उबाळे, प्रा.युवराज हेंबाडे, प्रा.स्नेहल बनारसे, प्रा.सुचिता ननावरे यांनी परिश्रम घेतले.