मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार 30 डिसेंबरला होणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, विस्तारात संधी मिळणाऱ्या मंत्र्यांची नावे अजूनही गुलदस्त्यातच आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तारावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
एका खासगी कार्यक्रमादरम्यान, फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली की,’हे सरकार विरोधाभासाने तयार झालेलं असून त्यामुळे सरकार चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं आहे, की इतके दिवस मंत्रिमंडळ तयार झालेलं नाही. तुम्हाला जनतेनं राज्य दिलं आहे, तर किमान मंत्रिमंडळाचा विस्तार तरी करा, अशा खोचक शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.