आळंदी – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीइआरटी) यांच्यामार्फत इयत्ता आठवीसाठी एनएमएनएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी) शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.
या परीक्षेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील साईप्रसाद कवडीकर, निशांत वाघमारे, सृष्टी पांचाळ हे 3 विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चमकले. या यशस्वी विद्यार्थ्यांना दरमहा 1000 प्रमाणे वर्षाचे 12 हजार. याप्रमाणे इयत्ता 12वी पर्यंत एकूण 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.