भिगवण – आजच्या जीवनात विद्यार्थ्यांना परिक्षेत गुण मिळणे पुरेसे नाही. विद्यार्थ्यांनी आवडीनुसार कलागुण जोपासावेत ही काळाची गरज आहे, असे मत मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी व्यक्त केले. भिगवण येथील कोंडीराम सदाशिव क्षीरसागर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात नुकतेच उत्साहात पार पडले.
आजच्या काळात शिक्षण संस्था चलविणे जिकीरीचे होऊन बसले आहे. शासनाची धोरणे बदलती राहिली तरी शैक्षणिक संस्था, विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सद्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास आणि त्यांच्या कलागुणांना विविध प्रकर्रे वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन गरजेचे आहे, त्यासाठी पालक, शिक्षकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे माजी संसदीय कार्य व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले.
यावेळी बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, कांचन कुल, अजीत क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी उपसभापती संजय देहाडे, यशवंत वाघ, अशोक शिंदे, संपत बंडगर, मारुतराव वणवे, विजयकुमार गायकवाड, अशोक पाचंगणे, चंद्रकांत मोरे आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य तुषार क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अविनाश गायकवाड यांनी केले. योगेश चव्हाण यांनी आभार मानले.