सध्या अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय मानुषी छिल्लरसोबत मुख्य भूमिका साकारत आहे . या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तो एका कार्यक्रमात पोहोचला होता, तेव्हा त्याने बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या वादावर भाष्य केले.
जेव्हा साऊथ हिरो किच्छा सुदीपने हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले तेव्हा अजय देवगणने त्याला ट्विटरवर चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील कलाकार एकमेकांशी शाब्दिक युद्ध करतांना दिसून येतात. सध्या बॉलीवूड आणि साऊथ सिनेसृष्टी एकमेकांपेक्षा स्वत:ला सरस सिद्ध करण्याची स्पर्धा करत आहेत.
यातच सर्व सेलिब्रिटींप्रमाणेच अभिनेता अक्षय कुमारनेही बॉलीवूड आणि साऊथ सिनेसृष्टी वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमारने दक्षिणेतील अनेक चित्रपटांच्या रिमेकमध्ये काम केले आहे. यामुळे या वादावर बोलतांना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,’मी दोन्ही इंडस्ट्रीला आपला पाठिंबा देतो. काही लोक आपापसात फूट पाडण्याची कृती करत आहे. मात्र या देशाला विभागू नका. दक्षिण भारत, उत्तर भारत किंवा बॉलिवूड याबद्दल बोलूच नका. जर काही लोक असं बोलत असतील तर तुम्हीपण तेच बोलू नका. भारतीय चित्रपटसृष्टी ही एकच आहे असं माझं म्हणणं आहे.
अक्षय कुमार पुढे म्हणाला,’देशाचे विभाजन करणे बंद करा. दक्षिण भारत किंवा उत्तर भारत म्हणणे बंद करा. मला व्यक्तिश: वाटते की ही भारतीय चित्रपटसृष्टी आहे.’ असेही ते म्हणाला