नवी दिल्ली – भारतामध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या वेगाने वाढत आहे. लॉक डाऊनच्या काळामध्ये बरीच डिमॅट खाती उघडली गेली आहेत. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.
मात्र सरकारने जर दीर्घ पल्ल्यातील भांडवली नफ्यावरील कर रद्द केला तर या क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल असे तज्ज्ञांना वाटते. केंद्र सरकारने 2018 मध्ये अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे एलटीसीसी सुरू केला होता. कोणत्याही विकसित देशांमध्ये अशा प्रकारचा कर नाही. त्यामुळे भारताला जर गुंतवणूक आकर्षित करायची असेल तर हा कर रद्द करण्याची गरज असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे.