मुंबई – भारतीय शेअर बाजाराच्या मुख्य निर्देशांकाबरोबरच स्मॉल कॅप आणि मिडकॅप मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे बुधवारी शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य एकाच दिवसात 13.47 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
अनेक दिवसापासून भारतातील मिड कॅप आणि स्मॉल कॅप आवश्यकतेपेक्षा जास्त वाढल्याचे चर्चा होत होती. आज मोठ्या कंपन्या बरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे गुंतवणूकदाराचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य 13.47 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 372 लाख कोटी रुपयांवर आले आहे.
भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त वाढल्याची चर्चा होत आहे. त्यातल्या त्यात छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिडकॅप आणि स्मॉल कॅप जास्त वाढले असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यानंतर आज मोठ्या कंपन्याबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक जवळजवळ दिड टक्क्यांनी कोसळले.
मोठया कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मुख्य निर्देशांकड दिड टक्क्यांनी कोसळले असले तरी मुंबई शेअर बाजाराचा स्मॉल कॅप तब्बल 5.11 टक्क्यांनी तर मिडकॅप 4.20 टक्क्यांनी कोसळला. यामुळे छोट्या कंपन्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून आले. बरेच विश्लेषक मिडकॅप आणि स्मॉल कॅप आवश्यकतेपेक्षा जास्त वाढले नसल्याचे म्हणत असले तरी गुंतवणूकदार सावध असल्याचे दिसून येते.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 906 अंकांनी म्हणजे 1.23 टक्क्यांनी कोसळून 72,761 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 338 अंकांनी म्हणजे दीड टक्क्यांनी कोसळून 21,997 अंकावर बंद झाला.
पावरग्रीड कंपनीचा शेअर सात टक्क्यांनी कोसळला. एनटीपीसी, टाटा स्टील, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. मात्र आयटीसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, नेस्ले, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक अशा परिस्थितीतही तेजीत असल्याचे दिसून आले.
जिओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम असली तरी छोट्या कंपन्यांचे शेअर आवश्यकतेपेक्षा जास्त वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित स्मॉल कॅप 5.11 टक्क्यांनी तर मिडकॅप 4.20 टक्क्यांनी कोसळले.
सर्वच क्षेत्राचे निर्देशांक आज कमी झाले. त्यामध्ये धातू, सेवा, दूरसंचार, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा समावेश होता. एकूण कंपन्यापैकी 3,516 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तर 400 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. 60 कंपन्यांच्या शेअरचे भाव कालच्या पातळीवर स्थिर राहिला.
सेबीच्या अध्यक्ष मधाबी पुरी बुच यांनी परवा बोलताना सांगितले होते की, छोट्या कंपन्यांचे शेअर आवश्यकतेपेक्षा जास्त वाढले असून या ठिकाणी फेस निर्माण झाल्यासारखे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही नियंत्रक म्हणून गुंतवणूकदारांना सावध करीत आहोत. मात्र काही विश्लेषकांनी मिड कॅप व स्मॉल कॅपमध्ये कसलाही फुगवटा निर्माण झाला नसल्याचे मत व्यक्त केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात वाढेल असे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे शेअरची खरेदी होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
(Stock Market, Investors lose Rs 13.47 lakh crore in one day)