नवी दिल्ली – फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू ही संस्थात्मक हत्याच असल्याची भावना एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींचे कुटुंबीय आणि त्यांच्या मित्र परिवाराने केला आहे.
स्वामी हे 84 वर्षीय ख्रिस्ती धर्मगुरू आणि आदिवासी हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते होते. त्यांना आठ ऑक्टोबर 2020 रोजी अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची प्रकृती ढासळल्याने उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांची प्राणज्योत सोमवारी मालवली.
स्वामी यांची अटक आणि त्यांची तळोजा कारागृहात केलेली रवानगी म्हणजे त्यांना फाशीची शिक्षा यापुर्वीच ठोठावली होती, याचे निदर्शक आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनाने भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींचे कुटुंबीय हादरून गेलो आहोत.
हा नैसर्गिक मृत्यू नसून एका सात्विक व्यक्तीचा अमनवी पध्दतीने केलेला हा संस्थात्मक खून आहे. त्यांनी झारखंडमध्ये आदिवसीाच्या हक्कांसाठी आयुष्य वाहून घेतले. त्यांची नैसर्गिक संसाधने आणि जमीनीसाठी ते लढत राहिले. त्यांना अशा पध्दतीने मृत्यू यायला नको होता. त्यांच्या लाडक्या झारखंडपासून दूर अशा ठिकाणी त्यांना केवळ शत्रूत्वाच्या भावनेतून डांबण्यात आले, असे या निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने शेवटची अटक केलेले स्वामी सर्वात वृध्द होते. त्यांची प्रकृती अस्वस्थ होती तरीही, आपल्या व्यक्तीमत्वातून आणि ध्येयनिष्ठेतून इतरांसाठी प्रेरणादायी होते. त्यांची कारागृहात प्रकृती खालावल्यानंतरही ते सहबंदीजनांसाठी प्रार्थना करत. त्यांचा विचार करत. त्यांनी सहकाऱ्यांना कसे खोटेपणाने गुंतवले आहे. आणि त्यांच्यावर सामाजिक अन्याय केला आहे, त्याविषयीही त्यांनी लिहले आहे, अशी पस्तीही या निवेदनात जोडण्यात आली आहे.
स्वामी यांना विशेष न्यायलयाने जामीन नाकारला. त्यांना कारागृहात असताना करोनाची बाधा झाली. ते उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार बाहेर आल्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यावर समजले, याकडे या निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
स्वामी 21 मे रोजी तळोजा कारागृहातून उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी मला माझ्या रांचीतील रुग्णालयात दाखल व्हायची इच्छा व्यक्त केली होती. त्याकडेही न्याय यंत्रणेने दूर्लक्ष केले.