मुंबई – आयपीएलच्या ३४व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ धावांनी पराभव केला. दिल्लीचा हा सलग दुसरा विजय आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. सामन्यानंतर हैदराबादचा कर्णधार एडन मक्रमनं आपली नाराजी व्यक्त केली.
या सामन्यात पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाला 20 षटकांत 144 धावा करता आल्या. या सोप्या दिसणाऱ्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादच्या फलंदाजांनी पहिली 15 षटके संथ गतीने फलंदाजी केली, ज्यामुळे संघाचा पराभव झाला.
हैदराबादकडून मयंक अग्रवालने 39 चेंडूत सर्वाधिक 49 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय त्याने 19 चेंडूत 31 धावांची धडाकेबाज खेळी केली. सरतेशेवटी, वॉशिंग्टन सुंदरने काही फटके मारत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या, तथापि, अंतिम षटकांमध्ये दिल्लीच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली.
सामना संपल्यानंतर हैदराबादचा कर्णधार एडन मकरम म्हणाला, “आम्हाला चांगले क्रिकेट खेळायचे आहे. आमच्याकडे चांगले गोलंदाज आणि फलंदाज आहेत पण कामगिरी चांगली नव्हती हे दुर्दैवी आहे. आम्हीच कमी पडलो. तो पुढे म्हणाला, खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी कशी करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. गोलंदाजांनी परिस्थितीचा फायदा घेत चांगली कामगिरी केली.